Aamhi Thanekar
ठाणे हे अतिशय जुने शहर आहे. ह्या शहराचे उल्लेख मध्ययुगीन काळातील शिलालेखात आणि ताम्रपटात सापडतात. हे शहर शिलाहार राजांची राजधानी होती. इटालियन प्रवासी मार्को पोलोने १२९० मध्ये ठाण्याला भेट दिली. ठाणे हे विकसित झालेले सुंदर शहर असल्याचा उल्लेख तो करतो. तसेच ठाणे हे मोठे बंदर असून तेथील व्यापारी कापूस, ताग आणि चामडे विकतात आणि घोडे खरेदी करतात असे तो म्हणतो.
पोर्तुगीज ठाण्यात १५३० मध्ये आले आणि त्यांनी शहरावर १७३९ पर्यंत सुमारे २०० वर्षे राज्य केले. मराठ्यांनी शहरावर १७३९ ते १७८४ राज्य केले. १७८४पासून स्वातंत्र्यापर्यंत शहर इंग्रजांच्या ताब्यात होते. भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर (आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) ,मुंबई ते ठाणे दरम्यान १८५३ मध्ये धावली.
ठाणे महानगरपालिका १९८२ साली स्थापन झाली.